Diwali 2023 : धनत्रयोदशी पूजा, मुहूर्त आणि सणाचे महत्त्व

 


Diwali 2023 :  धनत्रयोदशी   पूजा, मुहूर्त आणि सणाचे महत्त्व

   दिवाळीला खरी सुरुवात धनत्रयोदशीपासून होते.  दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण असतो. धनतेरस म्हणूनही   या सणाला ओळखतात.


धनत्रयोदशीचे महत्त्व 

Diwali 2023 Dhantrayodashi  : 

धनत्रयोदशीपासून दिवाळीला खरी सुरुवात होते. धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला असतो. या सणाला धनतेरस म्हणूनही ओळखतात. धनतेरस हा शब्द ‘धन’ आणि ‘तेरस’ या दोन शब्दांपासून बनला आहे. 

धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तेरस तेरावा दिवस दर्शवितो. पाच दिवसांचा दिवाळी सण अधिकृतपणे या दिवशी सुरू होतो. असे मानले जाते की, या दिवशी समुद्रमंथन किंवा समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रकट झाली.

“आयुर्वेदाचे हिंदू देव, भगवान धन्वंतरीची उत्पत्ती झाल्याकारणाने या दिवशी धन्वंतरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो.”  असे मानले जाते की, भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते.


धनत्रयोदशी मुहुर्त

 यंदा १० नोव्हेंबरला धनत्रयोदशी असून संध्याकाळी ५ : ५५ ते ८:२८ पर्यंत पुजेचा मुहूर्त आहे.


धनत्रयोदशीचे पूजन 

या दिवशी सोने, चांदी , भांडी खरेदीला विशेष महत्त्व असते. “नवीन भांड्यामध्ये धणे भरून त्याचे पूजन केले जाते आणि दुसऱ्या दिवसापासून ते वापरण्याची प्रथा आहे.

“धनत्रयोदशी दिवशी, कणकेच्या पिठामध्ये हळद घालून दिवा तयार केला जातो आणि तो सायंकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावण्यास सांगितला जातो. त्यामुळे यमाची कृपा होते.

याशिवाय धनत्रयोदशीला लक्ष्मी म्हणून झाडू अथवा केरसुणीची पुजा केली जाते. घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते असे मानले जाते.

धनत्रयोदशी साजरी करण्यामागील कथा

धनत्रयोदशी या सणामागे एक  कथा आहे.  

एका भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो.  पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा  दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. 

 यम जेव्हा राजकुमाराच्या खोलीत सापाच्या रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. यास्तव यम आपल्या यमलोकात परत जातो. तिने अशा प्रकारे  राजकुमाराचे प्राण वाचवले. 

त्यामुळे या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. सायंकाळी या दिवशी  घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. व  त्या दिव्यास नमस्कार करतात. असा समज आहे याने अपमृत्यू टळतो.

धनत्रयोदशीबद्दल आणखी एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा राक्षसांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले,  त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली.

त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आले. म्हणूनच धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. यामुळे या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

Post a Comment

0 Comments